महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा
माझा जन्म १९९६ चा..तसं मी लहानपणापासूनच अनेकजणांना "दादा"हा शब्द मोठ्या आदबीने एकमेकांना म्हणताना पाहिले आहे,त्याचे एकमेव कारण म्हणजेच...अजितदादा पवार..!!!! खरंच आज मी दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हे लिहित आहे पन मी नेमकं अस काय लिहू कि जे सार्या महाराष्ट्राला माहित नाही कारण या माणसाची कार्यशैलीच अशी आहे कि जे केलं ते सगळ लोकांच्या डोळ्यादेखत...एक घाव आन् दोन तुकडं..स्वत:ला शेतकरी नेता म्हणवून घेणारे अनेक नेते आहेत (म्हणजे फ्लॉवर हातात घेऊन कोबी घ्या असे म्हणणारे राजू शेट्टी किंवा शेतकर्याचा फुसका आव आणणारे सदाभाऊ) पन वडिलांच्या निधनानंतर शेतात दारी धरणारे,गाया-म्हशींच्या धारा काढणार्या दादांना सबंध महाराष्ट्रानंच पाहिलंय...बारामती दूधसंघाची विविध पदे असतील,छञपती कारखान्याचा संचालक असेल किंवा थेट राज्याचे उपमुख्यमंञीपद असेल म्हणजेच जे काही मिळवलंय ते हिम्मतीने.(तसं पाहिला तर पवारसाहेबांचा किती मोठा वारसा आहे आणि आपल्या राज्यात स्वत:ला संघर्ष... वगैरे वगैरे बिरूद लावणारे कितीतरी थेट मंञी झालेत.असो) तो एक विचारच आहे कि कोणत...