पवारसाहेब झिंदाबाद

               सध्याचा  दिल्लीतला महाराष्ट्र
                      *शरदचंद्र पवार*
               तमाम  देशातील जनतेच्या कपाळावर बारा वाजले असताना बारा बारा १९४० ला बारामतीत शारदाबाईंच्या आणि गोविंदरावांच्या पोटी जन्म घेऊन जनतेच्या कपाळावरील कोडं सोडवून तत्कालीन राजकारण्यांपासून ते आजतागायतच्या राजकारण्यांच्या कपाळावर 'बारा'वाजवणारे एक रसायन म्हणजेच 'शरद गोविंदराव पवार' म्हणजेच आपले लाडके साहेब...
                शरद पवार हे नाव १९६७ सालापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात सतत पुढे राहिलेलं नाव आहे. त्यांच्या नावाचं  गारूड कित्येक वर्ष महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जनतेच्या मनावर आहे. जनतेने त्यांना चार वेळा राज्याच्या सर्वोच्च पदावर आरूढ केलं. माझ्या पिढीने यशवंतराव ऐकले, वाचले पण जवळून पाहिले अथवा अनुभवले नाहीत. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाकडे पाहता पाहता माझी पिढी शरद पवार यांच्या कारकिर्दीची साक्षीदार आहे.परंतु आज हाच माझा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय?आणि धृतराष्ट्रा पेक्षाही जाड पट्टी महाराष्ट्राच्या जनतेने डोळ्यावर बांधली आहे का? असे विचारण्याची वेळ आली आहे.
बहुजनांच्या हक्कासाठी मंडल आयोग लागू
करण्यासाठी दिलेला लढा असो, मुंबईत
झालेल्या दंगली थांबण्यासाठी रात्र रात्र भर
प्रशासनासोबत काम करणं असो, भूकंपात उधवस्त
झालेल्या किल्लारीसह मराठवाड्याला दिलेली उभारी असो,मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी दिलेला लढा असो,कर्क रोगाशी इच्छा शक्तीच्या जोरावर
केलेली मात असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी (मुद्दाम कर्जमाफीचा उल्लेख केलाय कारण सध्याची महाएेतिहासिक कर्जमाफी आपण पाहतच आहे) करण्यासाठी स्वत:च्याच सरकारशी केलेला संघर्ष
असो(सध्या केवळ दिल्लीत चहा मिळेल एवढेच वजण असणारी कलाकार माणसं आहेत) शेतीच आधुनिकीकरण, सबसिडी,शेतीमालाला भाव,
कारखानदारी टिकावी म्हणून केलेला संघर्ष असो,
विदर्भातला पूर असो, मराठवाड्यातला दुष्काळ असो कि महाराष्ट्रात झालेली गारपीट असो,किंवा स्ञीयांना ५०% आरक्षण देण्याचा कायदा असो प्रत्येक
महाराष्ट्रावरील नव्हे तर सबंध देशाच्या संकटांच्या विरोधात हा कणखर 'सह्याद्री'  निधड्या छातीने गेली ५ दशके तोंड देत आहे. या सर्व गोष्टी करताना
महाराष्ट्राला विकासाची दिशा देत असताना महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा कधीही ढळू न देण्याची यशवंतरावांची शिकवण असेल कदाचित या अभूतपूर्व शक्तीमागे.
               खरंतर तथाकथित मिडिया वाल्यांनी, टि.
व्ही. वाल्यांनी, लेखकांनी,पत्रकारांनी,आणि विरोधकांनी खोटनाटं जुन उकरून आपली घरं भरण्याचा जुनाच पवार विरोधी खेळ चालू केला आहे. ट्रकभर पुरावे आहेत असे म्हणणार्या टाळक्यांचा ट्रक नेमका कोणत्या गाळात रोवला आहे याचा त्यांनाच सुगावा लागेना. संपूर्ण देशाला अन्न-धान्यामध्ये स्वयंपूर्ण करत या देशामध्ये दुसरी हरितक्रांती करत असतांना, गडचिरोलीपासून ते कोकणपर्यंत आणि बांधावरच्यापासून ते एसीमधल्यापर्यंत घारीप्रमाणे महाराष्ट्रावर लक्ष ठेवणाऱ्या पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. पवार हाडाचे शेतकरी असले तरी त्याचं
मार्केटिंग जर कच्चं आहे. म्हणजे सांगायच तर मोदीजी चहा विकत होते ही गोष्ट स्वतः त्यांनी बर्याच वेळा सांगितली पन मी स्वतःच्या डोक्यावर रानातली भाजी बारामतीतून ते पाटसच्या बाजारात विकली असं साहेबांनी एकदाही सांगितल नाही.टीव्ही वर, सोशल मिडीयावर, पेपरवर राहण्यासाठी एकीकडे काय काय नाटकं (जसे कि रडणे वगैरे वगैरे) या देशात चालू असतांना साहेबांनी कधी फेसबुक वर स्वतःचा फोटो किंवा विडिओ टाकून लाईक्स मिळवले नाहीत, कधी ट्विटर वरून टिव टिव केली नाही आणि कधीच घरातल्या वयस्कर वडीलधाऱ्यांना रस्त्यावर बसवून स्वतःच.मार्केटिंग केलं नाही.कारण जनतेच्या प्रेमाने मोठं झालेल्या या नेत्याला असल्या खोट्या प्रसिद्धीची कधी गरज वाटली नाही.जनतेने मनापासून त्यांना 'लाईक'केलंय.
               मोदींची देशाला गरज वाटली असेल पण
मित्रांनो या महाराष्ट्राला शिवरायांच्या, महात्मा फुलेंच्या, शाहूंच्या, बाबासाहेबांच्या,यशवंतरावांच्या  विचारांची, पवारसाहेबांच्या आधाराची गरज आहे आणि तेच खर आहे. अरे मला सांगा, मोदींच्या शपथ समारंभावेळी पवारसाहेबांना सलमान खानच्या मागील रांगेत खुर्ची स्थान मिले, कमीत कमी याच
मोदींनी गुजरातच्या भूकंपाच्या वेळी हेच
पवार साहेब गुजरातच्या मदतीला धावून गेले होते हे
विसरायला नको होते, मोदी विसरले पण तुम्ही का विसरलात रे बाबांनो ? अरे मुर्खांनो इतका अपमान सहन करूनही हा माणूस आजही शांत का आहे ?
कुणासाठी ? कशासाठी ? पण आपल्याला मात्र हे
परके व्यापारी जवळचे वाटायला लागले आहेत  का ?काय दिल यांनी तुम्हाला ? का तुम्ही एवढे स्वार्थी झालात ?
              विदर्भाला पुराचा तडाखा बसला, अहो याच पवार साहेबांनी दोन दिवसात साडे नऊशे कि.मी. चा प्रवास करून, बांधा-बांधावर जाऊन
सर्वांना आधार दिला, धीर दिला आणि दिल्लीत जाऊन भांडून नऊशे एकवीस कोटींची मदत
विदर्भासाठी आणली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील २ लाख हेक्टर मोसंबी-
डाळींबाच्या बागा साहेबांनी अशीच पायपीट करून वाचवल्या, तुम्हाला हे सगळे दिसले नाही ? महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी हा माणूस लढला, माथाडी कामगार, उस तोडणी कामगार, रिक्षावाले, एस. टी. कामगार, मजूर,
पोलिस, उपेक्षित कोणीही असोद्यात पवार साहेबांशिवाय यांच्या समस्यांवर तोडगा निघाला नाही. हे तुम्हाला कधीच दिसलं नाही का हो ?
की तुम्ही या खोट्या जाहिरांतीमुळे विसरले ?
खरतर भुईमूगाच्या शेंगा कुठे उगवतात हे माहीत नसणारेही उपटसुंब जेव्हा म्हणतात कि काय केल रं तुमच्या शरद पवारांनी?  तेव्हा त्यांच्या "मुघली"बुद्धीची कीव येते.पन लक्षात ठेवावं कि सुर्यावर थुंकले तरी सुर्याच्या तेजाला तसूभरही फरक पडत नाही  सांगणे फक्त याच साठी कि देशावर कोणतेही संकट आल्यावर अगदी भक्तांनाही ( भक्त शब्द परिचित असेलच)त्यांच्या देवापेक्षा आमचे साहेब पहिल्यांदा दिसतात,तेव्हा त्यांचा पवारद्वेष नेमका कोणत्या बिळात जातो, सांगा ना?ज्या माणसांच निवडणूकीला डिपॉझिट वाचवायची लायकी नसते तेव्हा तो फक्त  शरद पवारांवर टीका करून टीव्हीवर झळकायच बघतो आणि आपल्या बायकापोरांना मी टीव्हीवर आलोय असे सांगतो पन जेव्हा ते हे सांगतो तेव्हा त्याला "शरद पवार" नावाच्या जादूच नक्कीच कौतुक वाटत असेल याची मला खाञीच नव्हे विश्वास आहे. जोपर्यंत शरद पवार नावाचा पॉवरप्ले चालूय तोपर्यंत आपल्या बॉलिंगच काही खरं नाही,अस वाटत असल्यामुळेच काही कावळे मोकार रान उठवून 'तो पॉवरप्ले' संपण्यासाठी राञंदिवस काव-काव करत आहेत पन जशी बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली तशाच प्रकार जोपर्यंत माझ्यासारखी असंख्य शेतकर्याची पोरं  पवार साहेबांच्या बाजूने आहेत तोपर्यंत आम्ही पगारी सोशल मिडीयाने बदनामी करणार्या शहर्यांना नक्कीच पुरून उरू.शेवटी मित्रांनो इतिहासाची बखर वाचतांना 'शरद पवार नावाची बखर' नवीन पिढीला समजावी म्हणून घेतलेली ही खबरदारी आहे,आणि कुणाला होता आलं तर 'शरद पवार व्हाच'.
..........आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साहेब आपलाच :----सनी गाडे-पाटील

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्राचे लाडके दादा-अजितदादा

असे किती धर्मा पाटील हवेत...

संघर्षयोद्धा धनुभाऊ